Posts

Showing posts from 2018

मन ❤

मन जेव्हा असतं एकटं तेव्हा विचार करत बसतं... कधीही, कुठेही, कशाचाही कशातही अडकत असतं... कधी त्याला दुःख तर कधी सुख मिळतं आणि त्यातच ते नाराजी आणि आनंद व्यक्त करतं... भूतकाळात जाऊन आनंदात घालवलेल्या क्षणांचा विचार करतं तर कधी अतीव दुःखाने बैचेन होतं... जसा विचार केला तसं ते बदलत जातं आणि क्षणिक सुखताही, मावता मावेना एवढा आनंद व्यक्त करतं... खरच मन कसं विचित्र असतं जसं बदलवलं तसं बदलत जातं... -©प्रियंका पठाडे (p3)

काय वाटत असेल ...!

काय वाटत असेल मनाला? जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला त्रिभुवनही ठेंगण होत असेल अन् गगणातही आनंद मावत नसेल... हर्षाचा पारावर राहत नसेल अन् मनाला आनंदाच उधाण आलेलं असेल... जसा आकाशात पक्षी निडभिस्त उडत असेल तसच मन हे स्वच्छंदी भिरभिरत असेल... खरचं अकल्पनिय, अविस्मरणीय असेल  जेव्हा मनाला पाहिजे ते भेटेल... खरचं काय वाटत असेल मनाला? जेव्हा भेटेल पाहिजे ते त्याला...                          - ©प्रियंका पठाडे (p3)

||समांतर रेषा||

हो! दोन समांतर रेषाचं त्या कायमच सोबती करणाऱ्या... स्पर्शल्या जरी नव्हत्या तरी सोबतीच्या आशा कायम ओथंबलेल्या... क्षितिजाकडे आकांतलेल्या त्या नजरा भेटेल ना ती दोन्ही एका किनाऱ्या... हयातीतच नव्हता समुद्राचा दुसरा किनारा कशा मिळणार होत्या? दोन समांतर रेषा... अनपेक्षितच होतं मिलन प्रत्यक्षात पण झाल्या एक त्या, क्षितीजाच्या सुर्यास्ताला... -©प्रियंका पठाडे (p3)

बदल!

रंग उडाले चित्र फाटले... मेघ दाटले वीज गडगडली... वर्षा आली नाव वाहून गेली... क्षणार्धात सर्व पालटले डोळे माझे तेव्हा उघडले... माणूस ही बदलला अग्रस्तान ही बदलले... तो तोच होता ती तीच होती विचारसरणी मात्र बदलली होती... -©प्रियंका पठाडे(P3)

संवेदना...

प्रत्येक क्षण नाही करता येत कैद, डिजीटल डोळ्यात... पाण्याचं संथ गतीने वाहनं तर किलबिलाट करणाऱ्या पक्षांच गाणं... संवेदनाच हव्या त्याला पाण्याचा गारवा जाणवायला... तर गुदगुल्या करून जाणाऱ्या वाऱ्याशी गुपितं करायला... सळसळ करणाऱ्या पानांचं कानात गुंज करायला... अन झरझर करत अलगद पिवळी पाने हातात यायला... डोळे म्हणजे दरी असावी निसर्गाचं वैभव साठवायला... प्रेमळ स्पर्श असावा मऊ मऊ माती हातात घ्यायला... निरभ्र असू दे कायम विचार तुझा... आसमंताला ही कवेत घेता यावां इतका... निसर्गही तुझ्या प्रेमात पडेल... नितळ तुझं मन जर असेल!!! -©प्रियंका(P3)

अस्वस्थता!¡

थोडंस वेगळंच आहे सूत्र माझा अन त्याचं मी अस्वस्थ असले की साथ त्याची हवी असते मला पण एकटेपणा माझ्यापेक्षा ही जवळचा त्याचा कारण माझ्यापेक्षा त्याचीच साथ हवी असते त्याला प्रयत्न तो करत असतो मला स्पेस देण्याची धडपडत मी असते त्याला बोलतं करायची कदाचित दोघेही आपापल्या जागी बरोबर आहे पण संतुलन अजूनही कुठेतरी बिघडतयं कारण मला शब्द हवे असतात त्याचे अन त्याला अबोला हवा असतो त्या शब्दांचा विचित्र 'अवस्था' होऊन जाते त्या 'अस्वस्थेत' मोकळा श्वास गुदमरायला लागतो कारण.... मला शब्द हवे असतात त्याचे अन त्याला अबोला हवा असतो त्या शब्दांचा -©प्रियंका पठाडे(P3)

विस्कटलेलं मन..

माणसाचं मन विस्कटतं केलेल्या अपेक्षाने की नकळत झालेल्या सलगीने? अपेक्षा भंग होतात, भंगून मिटून जातात पण त्या सलगीच काय जी मनाला सारखी सलतीये! विस्कटलेलं मन ते वादळासारखा कधीही अशांत, स्वतःला विध्वंस करणारं नाहीच त्या मनाला भीती आता कशाची कारण ना ते आता स्वतःच, ना होणार दुसऱ्याचं ना रडतय, ना धडपडतय कोमात असल्यासारखं फक्त धडधडतय... -©प्रियंका पठाडे(P3)

पात्र!

जगणं म्हणजे जीवन नसतं उमलणं म्हणजे फुलण नसतं हसणं म्हणजे सुख असतं! रडणं म्हणजे दुःख असतं! कस असत! दाखवल तस दिसतं पण मुळात मात्र तसं नसतं हसू कधी दुःख लपवण्याचा आधार बनतं तर रडू कधी सुखाचं उधाण असतं आयुष्यच असच असतं जगण्यासाठी विविध पात्र निभवाव लागतं... -©प्रियंका पठाडे(P3)

चकवा-मृगजळ

चकवा-मृगजळ परत तीच वाट पुन्हा तोच रस्ता... चकवा तर नसावा ना! नाही, मृगजळ असेल कदाचित... परत फिरून तिथेच आलं मन कित्येक महिन्यांपूर्वी जिथं सोडलं होत... म्हंटला जरी चकवा तर काही वेळाने निघून जातो दिसलं जरी मृगजळ तरी क्षणात विरून जातं... हे थोडसं अवचितच घडतंय ना वेळ निघतोय, ना क्षण विरतोय... भरकटलेलं मन फक्त कायमचं कुणीतरी आपलसं करणारी जागा शोधतय... -©प्रियंका पठाडे (P3)